झपाटलेला बंगला part 2
मला वाटले कि तिथे कुणीतरी असेल. पण तिथे कुणी नव्हते. मी हळुहळू त्या बंगल्याकडे आकर्षित होत होते. येता जाता तिथे बराच वेळ पाहत असायचे. असे वाटायचे की जणु कुणीतरी मला बोलावत आहे माझी वाट पाहत आहे पण मी तिथे लक्ष देत नव्हते.जितकं होईल तितकं मन दुसरीकडे वळवत होते कारण अशा गोष्टिंची मला खुप भिती वाटते.
मला दररोज किँकाळ्या ऐकु येत होत्या.मी माझ्या room mate ला किँकाळ्या ऐकु येतात का म्हणुन विचारलं असता ती नाही म्हणाली म्हणजे ते आवाज फक्त मलाच ऐकु येत होते.
ते आवाज मलाच का ऐकु येतात याचा मी खुप विचार करत होते त्यात एक दिवस माझी room mate ३ - ४ दिवसांसाठी गावी गेली. मी त्यादिवशी एकटी खोलीत होते cls लाही गेले नाही. कसाबसा दिवस घालवला तर रात्री पुन्हा ते रहस्यचक्र सुरु झालं .
रात्री ७ वाजता पुन्हा मला त्या किँकाळ्या ऐकु येऊ लागल्या मी खुप घाबरले आणि माझ्या मैत्रिणीला (घरमालकिनीच्या मुलीला) झोपायला बोलवलं. ती येईपर्यँत सगळे आवाज शांत झाले.
त्या रात्री मी न जेवता झोपले त्यावेळी १० वाजले असतील. मला पुन्हा त्या किंकाळिने जाग आली तेँव्हा घड्याळात पाहिले तर १२ वाजले होते.
खुप आवाज येत होते म्हणुन मी terrece वर गेले. पाहते तर बंगल्यात कोणी नव्हते. मी खुप वेळ अशी पाहात राहिले. तितक्यात मला जाणवले की माझ्यामागे कोणीतरी उभं आहे . . . ते हळुहळू माझ्या जवळ येउ लागले पण माझी मागे वळुन पाहायची हिम्मत होत नव्हती. ते माझ्यामागे अगदी जवळ आले आणि त्यानी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी खुप घाबरले पण ती माझी मैत्रिण होती. तिला पाहताच मला बरे वाटले. मी तिला त्या बंगल्याबद्दल विचारले असता तिचे उत्तर ऐकुन माझ्या पायाखालची जमिनच सरकली. तिने सांगितले कि त्या घरात एक नवरा बायको राहत होते.एकदा रागानी त्याने त्याच्या बायकोला ठार मारले पण थोड्या दिवसात तो हि दिसेनासा झाला . . .
ते आवाज मलाच का ऐकु येतात हे जाणुन घ्यायचं मी ठरवलं. दुसर्या दिवशी माझी मैत्रिण तिच्या मामाच्या घरी गेली. मी पुन्हा एकटी होते. मी त्याही रात्री जेवले नाही. रात्री पुन्हा ते आवाज ऐकु येऊ लागले पण आज मी तयार होते. मी उठले आणि बंगल्याकडे गेले मी पुढे जाणार तोच "थांब बाळ एकटी जाऊ नको तो राक्षस तुला ऐकणार नाही. आता पुर्वजन्माची परतफेड करायची वेळ आली आहे" असा आवाज ऐकु आला मी मागे वळुन पाहिले तर एक आजोबा दिसले. त्यांनी काही मंत्र म्हणले आणि बंगल्याचं दार आपोआप उघडलं गेलं. आम्ही आत जाताच उग्र वास येऊ लागला.अमानविय अस्तित्व जाणवु लागले. तिथे पंख्याला एक सडलेलं प्रेत लोँबकळत होतं. त्याच्या चेहर्यावर एक क्रुर हसु होतं. आजोबांनी माझ्या हातात एक तांब्या दिला आणि सांगितलं कि याने याच्या बायकोला तळघरात जिवंत जाळलं होतं तिथे जा आणि तिची रक्षा घेऊन ये. मी थोडी घाबरले तेंव्हा माझ्या गळ्यातल्या ताईतकडे पाहुन ते म्हणाले की घाबरु नको तुला काही होणार नाही. मी खाली तळघरात गेले तेंव्हा बाळ आलीस का ? खुप वर्षांपासुन वाट पाहात आहे तुझी असा आवाज आला. मी रक्षा घेऊन आले त्या दुष्टात्माने मला घाबरवण्याचा खुप प्रयत्न केला पण असफल झाला. आजोबा फरशीवर काही आक्रूत्या आखुन मोठमोठ्याने काही मंत्र म्हणत होते. थोड्यावेळाने ते बोलले की ती माती मी या प्रेतावरुन घेतली आहे यावर ती रक्षा टाक म्हणजे हा राक्षस कायमचा नाहिसा होईल. हे पाहुन तो आत्मा "ए म्हातार्या थांबव हे सगळं नाहितर सोडणार नाही मी तुला" असं ओरडु लागला. तो आजोबांच्यावर झेप घेणार तोच मी पुर्ण ताकदिने ती रक्षा त्या मातीवर टाकली आणि तो नाहिसा झाला.
तेँव्हा आजोबा बोलले की आता तासाभरात पहाट होईल त्याआधी हि रक्षा नदित विर्सजित करावी लागेल. मी लगेच रक्षा तांब्यात भरली आणि आम्ही जवळच्या नदिकडे गेलो. आजोबा माझ्या मागे उभे होते. मी रक्षा विर्सजित केली आणि मागे वळुन पाहिलं तर तिथे आजोबा नव्हते. कदाचित ते माझी मदत करण्यासाठी तिथे आले होते.
त्यानंतर मला पुन्हा कसलेहि आवाज ऐकु आले नाहित पण मला ते सर्व सारखं आठवत असे आणि भिती वाटे म्हणुन मी ती खोली सोडली. आता त्या बंगल्यात एक कुटुंब राहात आहे आणि खुप सुखी आहे !
धन्यावाद
मला वाटले कि तिथे कुणीतरी असेल. पण तिथे कुणी नव्हते. मी हळुहळू त्या बंगल्याकडे आकर्षित होत होते. येता जाता तिथे बराच वेळ पाहत असायचे. असे वाटायचे की जणु कुणीतरी मला बोलावत आहे माझी वाट पाहत आहे पण मी तिथे लक्ष देत नव्हते.जितकं होईल तितकं मन दुसरीकडे वळवत होते कारण अशा गोष्टिंची मला खुप भिती वाटते.
मला दररोज किँकाळ्या ऐकु येत होत्या.मी माझ्या room mate ला किँकाळ्या ऐकु येतात का म्हणुन विचारलं असता ती नाही म्हणाली म्हणजे ते आवाज फक्त मलाच ऐकु येत होते.
ते आवाज मलाच का ऐकु येतात याचा मी खुप विचार करत होते त्यात एक दिवस माझी room mate ३ - ४ दिवसांसाठी गावी गेली. मी त्यादिवशी एकटी खोलीत होते cls लाही गेले नाही. कसाबसा दिवस घालवला तर रात्री पुन्हा ते रहस्यचक्र सुरु झालं .
रात्री ७ वाजता पुन्हा मला त्या किँकाळ्या ऐकु येऊ लागल्या मी खुप घाबरले आणि माझ्या मैत्रिणीला (घरमालकिनीच्या मुलीला) झोपायला बोलवलं. ती येईपर्यँत सगळे आवाज शांत झाले.
त्या रात्री मी न जेवता झोपले त्यावेळी १० वाजले असतील. मला पुन्हा त्या किंकाळिने जाग आली तेँव्हा घड्याळात पाहिले तर १२ वाजले होते.
खुप आवाज येत होते म्हणुन मी terrece वर गेले. पाहते तर बंगल्यात कोणी नव्हते. मी खुप वेळ अशी पाहात राहिले. तितक्यात मला जाणवले की माझ्यामागे कोणीतरी उभं आहे . . . ते हळुहळू माझ्या जवळ येउ लागले पण माझी मागे वळुन पाहायची हिम्मत होत नव्हती. ते माझ्यामागे अगदी जवळ आले आणि त्यानी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी खुप घाबरले पण ती माझी मैत्रिण होती. तिला पाहताच मला बरे वाटले. मी तिला त्या बंगल्याबद्दल विचारले असता तिचे उत्तर ऐकुन माझ्या पायाखालची जमिनच सरकली. तिने सांगितले कि त्या घरात एक नवरा बायको राहत होते.एकदा रागानी त्याने त्याच्या बायकोला ठार मारले पण थोड्या दिवसात तो हि दिसेनासा झाला . . .
ते आवाज मलाच का ऐकु येतात हे जाणुन घ्यायचं मी ठरवलं. दुसर्या दिवशी माझी मैत्रिण तिच्या मामाच्या घरी गेली. मी पुन्हा एकटी होते. मी त्याही रात्री जेवले नाही. रात्री पुन्हा ते आवाज ऐकु येऊ लागले पण आज मी तयार होते. मी उठले आणि बंगल्याकडे गेले मी पुढे जाणार तोच "थांब बाळ एकटी जाऊ नको तो राक्षस तुला ऐकणार नाही. आता पुर्वजन्माची परतफेड करायची वेळ आली आहे" असा आवाज ऐकु आला मी मागे वळुन पाहिले तर एक आजोबा दिसले. त्यांनी काही मंत्र म्हणले आणि बंगल्याचं दार आपोआप उघडलं गेलं. आम्ही आत जाताच उग्र वास येऊ लागला.अमानविय अस्तित्व जाणवु लागले. तिथे पंख्याला एक सडलेलं प्रेत लोँबकळत होतं. त्याच्या चेहर्यावर एक क्रुर हसु होतं. आजोबांनी माझ्या हातात एक तांब्या दिला आणि सांगितलं कि याने याच्या बायकोला तळघरात जिवंत जाळलं होतं तिथे जा आणि तिची रक्षा घेऊन ये. मी थोडी घाबरले तेंव्हा माझ्या गळ्यातल्या ताईतकडे पाहुन ते म्हणाले की घाबरु नको तुला काही होणार नाही. मी खाली तळघरात गेले तेंव्हा बाळ आलीस का ? खुप वर्षांपासुन वाट पाहात आहे तुझी असा आवाज आला. मी रक्षा घेऊन आले त्या दुष्टात्माने मला घाबरवण्याचा खुप प्रयत्न केला पण असफल झाला. आजोबा फरशीवर काही आक्रूत्या आखुन मोठमोठ्याने काही मंत्र म्हणत होते. थोड्यावेळाने ते बोलले की ती माती मी या प्रेतावरुन घेतली आहे यावर ती रक्षा टाक म्हणजे हा राक्षस कायमचा नाहिसा होईल. हे पाहुन तो आत्मा "ए म्हातार्या थांबव हे सगळं नाहितर सोडणार नाही मी तुला" असं ओरडु लागला. तो आजोबांच्यावर झेप घेणार तोच मी पुर्ण ताकदिने ती रक्षा त्या मातीवर टाकली आणि तो नाहिसा झाला.
तेँव्हा आजोबा बोलले की आता तासाभरात पहाट होईल त्याआधी हि रक्षा नदित विर्सजित करावी लागेल. मी लगेच रक्षा तांब्यात भरली आणि आम्ही जवळच्या नदिकडे गेलो. आजोबा माझ्या मागे उभे होते. मी रक्षा विर्सजित केली आणि मागे वळुन पाहिलं तर तिथे आजोबा नव्हते. कदाचित ते माझी मदत करण्यासाठी तिथे आले होते.
त्यानंतर मला पुन्हा कसलेहि आवाज ऐकु आले नाहित पण मला ते सर्व सारखं आठवत असे आणि भिती वाटे म्हणुन मी ती खोली सोडली. आता त्या बंगल्यात एक कुटुंब राहात आहे आणि खुप सुखी आहे !
धन्यावाद
Comments
Post a Comment